केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडत येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून पैशांची उधळपट्टी करणारा हा अर्थसंकल्प असेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र सगळे अंदाज चुकीचे ठरवत निर्मला सीतारमण यांनी उधळपट्टी न करणारा एक सुरक्षित अर्थसंकल्प सादर केला आहे असं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.